विहिरीच्या खोदकाम दरम्यान झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
![](https://activemarathinews.co.in/storage/2024/06/IMG-20240616-WA0021-780x470.jpg)
विहिरीच्या खोदकाम दरम्यान झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत विहिरीचे खोदकाम दरम्यान झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
शनिवार दिनांक 15 जून रोजी पाच वा. सुमारास टाकळी येथे विहिरीच्या खोदकाम करताना जिलेटिन चा भीषण स्फोट होऊन यामध्ये सुरज उर्फ नासिर ईसुफ इनामदार वय २५ राहणार टाकळी कडेवळीत ,
गणेश नामदेव वाळुंज वय 25 राहणार टाकळी कडेवळीत, नागनाथ भालचंद्र गावडे वय 29 राहणार बारडगाव तालुका कर्जत
या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर वामन गेना रनशिंग, रवींद्र गणपत खामकर, जब्बार सुलेमान इनामदार सर्व राहणार टाकळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते
या घडलेल्या घटनेमुळे परिसरात नव्हे तर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे
श्रीगोंद्यात नव्हेतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विहिरीत जिलेटिन चे स्फोट झालेले आहेत
आणि यामध्ये कामगारांचा मृत्यू होणे याला जबाबदार कोण असा सवाल सामान्य नागरिक विचारीत आहे
मलंग बशीर शेख राहणार दुरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
यांनी सदर घटनेस कारणीभूत म्हणून संजय शामराव इथापे राहणार टाकळी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून श्रीगोंदा पोलिसांनी भा.द.वी कलम
३०४,२८५,२८६,३३७,३३८ सह
बारी अधिनियम १९०८ चे कलम ३,४,५,६, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे