Breaking
ब्रेकिंगराजकिय

प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस*

0 0 2 7 6 8

प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस*

*मुंबईत काँग्रेसला नवी ताकद व उर्जा देण्याचे वर्षा गायकवाड यांचे काम.*

मुंबई, दि. 28 जून
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत प्रा. वर्षा गायकवाड यांनी एका वर्षात पक्ष मजूबत करण्याचे काम केले आहे. वर्षा गायकवाड यांनी मुंबईकरांचे प्रश्न घेऊन विधिमंडळासह रस्त्यावरही दोन हात करत सत्ताधारी पक्षाला जाब विचारला. शहरातील झोपडपट्टीवासियांचे प्रश्नी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांच्याबरोबरीने सरकारशी लढा दिला व आजही तो लढा सुरुच आहे. वर्षा गायकावड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतही मुंबईतील सहा पैकी चार जागांवर विजय संपादन करून काँग्रेसची विजयी पताका फडवली असल्याचे काँग्रेस प्रवक्ते आणि मुंबई स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.

खासदार राहुलजी गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा काढून देशातील वातावरण बदलवले. या यात्रेला मुंबईत विशेषतः धारावीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशाभरतीला इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर न्याय यात्रेची प्रचंड मोठी सांगता सभा झाली. मुंबईत १८ वर्षानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची एवढी प्रचंड सभा झाली, त्या सभेच्या नियोजनातही वर्षा गायकवाड यांचे योगदान मोठे होते. मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून मुंबईकरांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. नीट परिक्षेच्या पेपरफुटीनंतर मुंबईत रस्त्यावर उतरून भाजपा सरकारचा निषेध नोंदवला. जनतेसाठी सदैव तत्पर असे वर्षा गायकवाड यांचे नेतृत्व आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड यांनी अनेक अडचणींचा सामना करत तानाशाही सत्ताधाऱ्यांशी दोन हात केले. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विचार मुंबईत घराघरात पोहचवण्याचे काम झाले. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या प्रमाणेच लोकांच्या मदतीसाठी त्या धावून जातात. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्या रुपाने दलित, वंचित, मागासवर्गीय समाजाला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कामाचा सपाटा सुरु असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे