जामनेर:- चिचखेडा (प्रतिनिधी) ता.15 जून जामनेर जि.जळगाव) गावातील सहा वर्षाच्या आदिवासी समाजातील बालिकेवर नराधमांनी बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी सदर आरोपींचा गुन्हा जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी जळगाव जिल्हा युवक पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जामनेरचे तहसीलदार यांना करण्यात आली असून सदर केस जलगती न्यायालयात न चालवल्यास पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जामनेर तहसील कार्यालयातच या मांडण्याचा इशारा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर पवार यांचे नेतृत्वाखालील विशिष्ट मंडळांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर शिष्टमंडळामध्ये जळगाव तालुका अध्यक्ष हिरकण भिल, सुधाकर भिल, रितेश भिल, शुभम भिल, बारकू भिल, सिद्धार्थ कांबळे, रमेश पाचुणे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0
0
2
7
7
8
0
0
2
7
7
8